Ban On Fishing : महाराष्ट्रात 2 महिने मासेमारी बंद; मत्यव्यवसाय विभागाचे आदेश

Ban On Fishing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ban On Fishing: राज्यात सध्या अवकाळी पावसाने हाहाकार उडवला असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यातच यंदा मान्सूनचे आगमन सुद्धा होणार आहे. मान्सून 25 ते 27 जूनपर्यंत केरळमध्ये धडकणार आहे. तर, त्यानंतर तळकोकणात हजेरी लावणार असून 1 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मत्यव्यवसाय विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जून ते 31 जुलैदरम्यान मासेमारी बंद करण्याचे आदेश मत्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. त्यामुळे खव्वयांच्या ताटात आता फ्रेश मासा असणार नाही.

मासेमारी का बंद केली? Ban On Fishing

पावसाळा हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळं 1 जून ते 31 जुलैदरम्यान मासेमारी बंद असणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळं 1 जून ते 31 जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना समुद्रात मासेमारी करण्यास मत्स्य विभागाने बंदी घातली आहे. परंतु फक्त यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांनाच ही बंदी राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर – यंत्रचलित नौकांना ही बंदी लागू असणार नाही. मत्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका 1 जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे.

सूचना न पाळल्यास कारवाईचा इशारा –

मासेमारी बंदीच्या काळात सागरी कायद्याचा भंग केला आणि सूचना न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मत्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आला आहे. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मासेमारी बंद असल्यामुळं (Ban On Fishing) मासळी बाजारात होणारा पुरवठा हा कोलकाता किंवा गुजरात या भागातील असणार आहे. तसंच, खवय्यांना काहीकाळ सुक्या मच्छिवर अलवंबून राहावे लागणार आहे.