बांगलादेशातील हिंसाचाराचा थेट भारतीय शेतकऱ्यांना फटका; शेतमालाची निर्यात झाली ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशमध्ये खूपच हिंसक असे वातावरण झालेले आहे. बांगलादेशातील या वातावरणानंतर आता भारताने आपल्या सीमा देखील बंद केलेल्या आहेत. म्हणजे भारतातून बांगलादेशमध्ये ज्या काही शेतमालांची निर्यात होत होती. ती आता पूर्णपणे थांबवलेली आहे. भारताकडून बांगलादेशला जवळपास 75 टक्के शेतमाला हा निर्यात होत होता. परंतु आत्ताच्या या घडीला दोन्ही देशांचे मोठे नुकसान होणार आहे. कारण त्यांना देखील शेतमाल कमी पडणार आहे. आणि भारतातील शेतमाल जास्त विकला न केल्याने भारताला देखील आर्थिक फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधून दररोज 70 ते 80 ट्रक कांद्याचे हे बांगलादेशला निर्यात होत असतात. परंतु बांगलादेशला निर्यात होणारे कांद्याचे शेकडो ट्रक आता बांगलादेशच्या सीमेवरच थांबवलेले आहेत. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे. .

या एका ट्रकमध्ये जवळपास 30 टन एवढा कांदा भरला जातो. मागील आठवड्यात बांगलादेशकडे गेलेल्या कांद्याचे शेकडो ट्रक सीमेवर अडकून पडलेले आहेत. त्यामुळे आता हा कांदा कोलकत्ता मध्येच अगदी कमी भावात विकायला लागू शकतो. 50000 टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत आता भारतातील कांदा निर्यात दराने शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात धडपड सुरू झालेली आहे. नाशिकमधून जवळपास 80 टक्के कांदा येत असतो. परंतु आता कांद्याचे ट्रक अडवल्याने कोट्यावधी रुपयांचे व्यवहार देखील थांबलेले आहेत.

या घटनेनंतर आता भारतातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे. आणि बांगलादेशमध्ये जी अस्थिर परिस्थिती आहे. त्यामुळे भारताची दळणवळण व्यवस्था देखील थांबलेली आहे. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे देखील पत्रात लिहिले आहे. अशा शेतकऱ्यांना दिल्याशिवाय देण्याची नागरिक देखील राजू शेट्टी यांनी केलेली आहे.

बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. यातच त्यांच्या पंतप्रधानांनी देखील राजीनामा देऊन सोडलेला आहे. या हिंसाचारात गेल्या तीन दिवसांमध्ये 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आलेली आहे. त्यामुळे बांगलादेशाचे भारताशी असणारे मोठे व्यवहार देखील बंद झालेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण होत असते. परंतु आता या अहिंसक वातावरणामुळे सगळेच व्यवहार बंद झालेले आहेत.