Best Schemes of Modi Government| गोरगरीब जनतेसाठी मोदी सरकराने आणल्या ‘या’ योजना, आर्थिकदृष्ट्या मिळाला मोठा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Best Schemes of Modi Government | केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक उत्कृष्ट योजना सुरू केलेल्या आहेत. गोरगरीब कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्याचा फायदा देशातील करोडो कुटुंबांना होत आहे. या योजनांचा आधार घेऊन अनेक कुटुंबांनी त्यांची प्रगती देखील केलेली आहे. देशातील नागरिकांसाठी मोदी सरकारने या योजना सुरू केलेल्या आहेत. आता आपण अशा पाच योजनाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांना याचा खूप चांगला फायदा होत आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना | Best Schemes of Modi Government

केंद्र सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत देशातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. ज्या शेतकऱ्यांच्या आपण नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दोन लाख रुपयांपर्यंत संरक्षण देत असते. शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम भरावी लागते आणि उर्वरित रक्कम सरकार देणार आहे.

उज्वला योजना

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. महिलांना स्वयंपाक करताना धुराचा सामना करावा लागतो. त्यांचे हे कष्ट दूर करण्यासाठी सरकारनेही उज्वला गॅस कनेक्शनची योजना सुरू केलेली आहे.

मोफत शिलाई मशीन योजना

महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी शिवण यंत्र सरकारकडून दिली जातात.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

केंद्र सरकारने 2023 मध्ये कारागीर आणि कारागीरांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशातील सुतार, सुतार, शिल्पकार, कुंभार समाजातील तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. त्याच वेळी, या कर्जावर सुमारे 5% व्याज भरावे लागेल.

प्रधानमंत्री आवास योजना | Best Schemes of Modi Government

सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशातील दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना सुमारे 1,30,000 रुपये आणि शहरी भागातील लोकांना सुमारे 1,20,000 रुपयांची मदत मिळते.