फडणवीसांचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; आता ‘या’ गोष्टीवरुन व्यक्त केली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था ।  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतच आहे. तसेच मृतांची संख्याही वाढते आहे. मुंबईमध्ये तर दिवसागणिक नवी आव्हाने समोर येत आहेत. यावर चिंता व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठरे यांना याबाबत पत्रच लिहिले आहे. देवेंद्र  फडणवीस सध्या राज्य सरकारच्या विरोधातील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. या संक्रमण काळात अनेकदा हे सरकार अपयशी असल्याचे विधान त्यांनी केले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी मुंबईमधील घटत्या चाचणी प्रमाणाच्या चिंतेबद्दल पत्र लिहिले आहे.

फडणवीस यांनी या पत्रात मुंबईतील कोरोनामुळे असणारा मृत्युदर आणि चाचण्यांचे घटते प्रमाण यावर लिहिले आहे. त्यांनी मुंबईमधील प्रयोगशाळांमध्ये दिवसाला १० हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे मात्र दररोज केवळ साडेतीन हजार ते चार हजारच चाचण्या का होत आहेत असे विचारले आहे. सध्या महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रुग्ण असणारे राज्य आहे. तर मुंबई हा सर्वधिक रुग्णसंख्या असणारा जिल्हा आहे. याबाबतच त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

दरम्यान राज्यातील रुग्णसंख्या ७४ हजार पार झाली आहे. राज्यातील आर्थिक व्यवहार पुन्हा हळूहळू सुरु केले जात आहेत. संचारबंदीचे नियम काही अंशी शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे मात्र सर्वत्र सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment