राज्यपालांनी जाहीर केली शेतकऱ्यांना आर्थिक मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार खरीपासाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये देणार असल्याचं परिपत्रक जारी केलं आहे. तसेच फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे.

तसेच शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्यात असून, विधार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केलं गेलेलं आहे. तसेच दहा हजार संचित निधी ओल्या दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. मात्र, ही मदद देताना २ हेक्टरची मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्यामुळं या जाहीर झालेल्या निधीतून २ हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार हा आता सवाल अजूनही कायम आहे.

 

Leave a Comment