R.R.पाटील यांच्यानंतर आता जयंत पाटील संभाजी भिडेंच्या बचावाला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर आर पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजपचं काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी केंद्राने NIA कडे सोपवल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे.

पोलिस अधीक्षकांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडेंच्या बचावाला जयंत पाटील आहेत ना. पूर्वी आर आर पाटील होते. आता जयंत पाटील आहेत. भाजपचं काम काही मंत्रीच करत आहेत, असं प्रकाश आंबेडकर ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय निषेधार्ह आणि चुकीचा आहे. तपासातील खोटेपणा उघड होण्याची सरकारला भीती वाटते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा फक्त TRP वाढवण्यासाठी आहे, असं टीकास्त्रही प्रकाश आंबेडकरांनी सोडलं.

Leave a Comment