नवनीत राणा यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | नवनीत राणा याची शिवसेनेवर आज चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्यावर आज नवनीत राणा यांनी जळजळीत टिका केली आहे. महाराष्ट्रातील काही पक्ष शेतकऱ्याची कळकळ असल्याचे नाटक करतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे नाटक सुरु केले आहे. कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली आहे त्यावर शिवसेना काय कशी बोलत नाही असे म्हणून नवनीत राणा यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे.

जे सत्तेत राहुन शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. ते रस्त्यावर उतरवून शेतकऱ्यांना न्याय काय देणार. कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली आहे. त्यावर शिवसेना काय बोलत नाही त्यामुळे त्यांचे शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणे हे नाटकच वाटणार असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. देशात बनावट खत कंपन्या शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर उपाय म्हणून केंद्र सरकाने नियंत्रण समिती स्थापन करावी अशी मागणी केंद्र सरकार कडे केली आहे असे देखील नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

पीक विम्याच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे असा मुद्दा समोर ठेवून शिवसेनेने आज वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती अँक्सा कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकरात लवकरात दिले जावेत. तसेच त्यांनी होणारी आर्थिक फसवणूक लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी शिवसेनेने या मोर्चाच्या माध्यमातून केली होती. याच मोर्च्यावर नवनीत राणा शिवसेनेवर बरसल्या आहेत.

Leave a Comment