आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात म्हणून त्यांना पेंग्विन म्हणतात : धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशीम प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सभेत धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणाले की, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा चालू आहे, तर भाजपची महाजनादेश यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेत सरकारने केलेली कामं सांगतात. पण ही कामं फक्त त्यांच्या पुण्यवान कार्यकर्त्यांनाच दिसतात, सामान्य जनतेला दिसत नाहीत.

युती सरकारने गेल्या पाच वर्षात सर्वांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. दिवसाला ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार मात्र महाजनादेश यात्रा काढत आहे. त्यामुळे आमचं सरकार आणा, सरसकट सातबारा कोरा करू, तसेच राज्यात असलेल्या लाखो जागा भरु, ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल, असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं.

Leave a Comment