गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली : जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. गणेश नाईक पाच वर्ष पक्ष धुवून खातील आणि अचानक पक्ष सोडून निघून जातील असे मी पक्षाला वारंवर सांगत होतो. परंतु पक्षाने माझे ऐकले नाही. शेवटी मला जी भीती होती तेच झाले असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणले आहे.

गणेश नाईक यांचे पक्ष सोडण्याचे आज चालले नाही. त्यांनी याआधी देखील पक्ष सोडण्याचे प्रयत्न केले आहेत असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. २०१४ साली शरद पवार यांचे ऑपरेशन सुरु असताना ते अन्य पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेण्यात व्यस्थ होते तेव्हा त्यांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत. मात्र आता त्यांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आसा खळबळजनक दावा गणेश नाईक यांनी केला आहे.

गणेश नाईक यांचे नव्या मुंबईमध्ये मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वलयावर नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता प्रस्तापित करण्यामध्ये त्यांना मोदी लाटेत देखील यश मिळाले होते. उद्या ते राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Leave a Comment