लगीर झालं जी… या मालिकेचा असा होणार शेवट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |आज्या शीतलीच्या भांडणापासून सुरु झालेली लगीर झालं जी मालिका अजिंक्यच्या आर्मीत भरती होण्याच्या जिद्दीने आणि अजिंक्य आणि शीतलच्या प्रेमाने नाहून निघाली. मात्र आता या मालिकेच्या कथानकात पहिल्या सारखा दम उरला नाही. त्यामुळे लगीर झालं जी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शीतलच्या पोटात सध्या बाळ वाढत आहे. त्या बाळा भोवती सध्या मालिकेचे कथानक फिरते आहे. मात्र आता हि मालिका एका वेगळ्या वळणावर जाऊन थांबणार आहे.

शीतलला मुलगा होणार असून त्याच दरम्यान अजिंक्य आर्मी कॅम्प मधून गायब होणार आहे. अशा अवस्थेत अजिंक्यचा आर्मी कडून शोध घेतला जाणार आहे. त्याच दरम्यान अजिंक्य जिवंत राहिला नसल्याचे वादळ त्याच्या गावात उठणार आहे. तसेच शीतलला देखील हि बातमी समजताच ती देखील अस्वस्थ होणार आहे.

अजिंक्यचा काहीच तपास लागत नसताना आणि त्याचा मृत देह देखील सापडला नसताना शीतल आर्मीत भरती होण्याची जिद्द घेऊन आर्मीच्या भरतीची तयारी करणार आहे. सोबत छोट्या मुलाचा सांभाळ देखील करणार आहे. अशा परिश्रमाच्या कसोटीत ती आर्मीत भरती होणार आहे. त्याच वेळी अजिंक्य पाकिस्तानात असल्याची बातमी आर्मीला मिळणार आहे. तेव्हा त्याला भारतात आणण्याची तयारी केली जाणार आहे. ज्या वेळी अजिंक्यला भारतात आणले जाईल त्याच वेळी शीतल त्याचे स्वागत आर्मीच्या वर्दी मध्ये करणार आहे. शीतलला आर्मीच्या वर्दीत पाहून अजिंक्यला आनंद होणार आणि त्या दोघांचे त्यांच्या मूळ गावी मोठ्या आनंदता स्वागत केले जाणार आणि तेथेच या मालिकेचा समारोप होणार. येत्या २२ जूनला हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्या ठिकाणी मिसेस मुख्यमंत्री हि मालिका सुरु होणार आहे.

Leave a Comment