खुशखबर !! शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; अर्थसंकल्पाच्या आधीच मिळणार दिलासा

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 फेब्रुवारी 2025 रोजी, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पापूर्वी, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने इथेनॉलच्या खरेदीसाठी किमती वाढवण्यास मंजुरी दिली आहे, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे . या सुधारित किमती 1 नोव्हेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहतील. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ –

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधारित किमती 1 नोव्हेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहतील. CCEA (कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स) ने इथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रोग्राम अंतर्गत C-Heavy मोलॅसिस (CHM) ची एक्स-मिल किंमत 56.58 रुपये प्रति लीटर वरून 57.97 रुपये प्रति लीटर केली आहे. या निर्णयामुळे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच, कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल. सरकारने इथेनॉलच्या अधिकाधिक वापराच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत, ज्यामुळे हरित ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे.

सर्वांगीण विकास साधला जाणार –

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) इथेनॉल खरेदी किंमतीत सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. 2025-26 ते 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट सरकारने वाढवले आहे. यासाठी, 2024-25 मध्ये 18 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याची योजना आहे. यासोबतच, मोदी सरकारने खनिजांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाच्या खनिजांच्या शोधासाठी 16,300 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाला (NCMM) मंजुरी दिली आहे. या अभियानाद्वारे खनिज उत्खनन, खाणकाम आणि प्रक्रियेतील मूल्य साखळीचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. यामुळे देशाच्या स्वावलंबनास चालना मिळेल आणि महत्त्वाच्या खनिजांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.