… यामुळे राष्ट्रवादीमधील बंडाळी बाहेर येत नाही; बावनकुळेंनी लगावला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले मात्र अजित पवार काही कारणास्तव अणुउपस्थित राहिले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाना मोठे उधाण आले. या प्रकारावरून भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
अजित पवार कधीही कुठे जातात आणि परत येतात. अजित पवार कधी नाराज होतील, याचा नेम नाही. यावरुन असं दिसतय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस आहे. सत्ता गेल्यापासून सर्वच अस्वस्थ आहेत. गेल्या अडीच वर्षात जो भ्रष्टाचार झाला त्याची भिती आता त्यांना वाटत आहे. शरद पवार साहेबांमुळे ही बंडाळी रस्त्यावर येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व पवार साहेबांमुळे आहे, ते असेपर्यंत हे कुठे जातील एवढी त्यांच्यात हिम्मत नाही, असा टोलादेखील बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही : बावनकुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपा 40 वर्षे विरोधात होती. हे क्ष वाचवण्यासाठी आघाडी करतील. मागच्या वेळेस कपट कारस्थान करुन सत्तेत आले अशी टीकादेखील त्यांनी (chandrashekhar bawankule) यावेळी केली. यादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय