उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारलं असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली. दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही असे म्हणत हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही. त्यामुळे प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. ती जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे. उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल पुण्यातील कात्रज चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत हे तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज येथे सामंत यांची गाडी थांबली. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गद्दार गद्दार म्हणत सामंतांच्या गाडीची काच फोडली. सुदैवाने या हल्ल्यातून सावंत थोडक्यात बचावले