डांभेवाडीत अवकाळी पाऊस – गारपिठीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या बागावरही विपरित परिणाम झाला आहे. कटाव तालुक्यातील डांभेवाडीत अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष बागांच्या नुकसानीची आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून कृषी अधिकारी, तलाठी यांनी पाहणी करत पंचनामे करून घेतले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/210334358302280

डांभेवाडी, ता. खटाव येथे काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे, गारपिठीमुळे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागास आज काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांनी भेट दिली आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करुन घेतले.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

यावेळी विश्वास तुपे, धनाजी निंबाळकर, जयकुमार बागल, रवी नलवडे, कल्पेश बागल, मारुती सपकाळ, अर्जुन बागल, हणमंत बागल, गोरख नलवडे, बाळासाहेब बागल, विजय बर्गे, केशव बागल, विक्रम बागल व ग्रामस्थ उपस्थित होते.