तिहेरी हत्याकांडाने नव्या मुंबईत खळबळ ; भंगार विक्रेत्या तरुणांची सपासप वार करून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई प्रतिनिधी | तुर्भे औद्योगिक वसाहतीत भंगार दुकान चावणाऱ्या तिघांची सपासप वार करून एकाच वेळी हत्या केल्याची घटना नव्या मुंबईत घडली आहे. या घटनेने नवी मुंबईमध्ये खळवळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्या झाली तेव्हा तरुण झोपेत असल्याने त्यांना बेसावध अवस्थेत संपवण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.

बंद कंपनीच्या आवारात हे तिघे तरुण भंगार दुकान चालवण्याचे काम करत होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांचा धारधार शस्त्राच्या सहाय्याने खून केला आहे. सकाळी आसपासच्या लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असे पोलिसांनी दिलेल्या माहितून उघड झाले आहे.

इर्शाद (वय २०), नौशाद (वय १७), राजेश (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. आर्थिक वादातून, धंद्याच्या स्पर्धेतून अथवा चोरीच्या उद्देशातून हे खून झाले असावेच असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ज्या ठिकाणी हि हत्या झाली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावले गेले असल्याने त्याची देखील पोलीस तपासला मदत होईल असे मत वार्ताहराने व्यक्त केले आहे.

Leave a Comment