पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे.

लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाली नाही. मोबदला न देताच जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतातून काम सुरु केले आहे.

आज पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा. या मागणीसाठी हे काम रोखले आहे. दत्तात्रय काऴे या शेतकऱ्याची चार गुंठे जमिन या कामासाठी संपादन केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ते पैसे मिळावेत. यासाठी ते अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवत आहेत. अशातच आता पैसे न देताच काम सुरु केले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment