नगरसेविकेच्या मुलीचा जावयानेच केला सपासप वार करून खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडली आहे. मयत स्त्री कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शिवसेना नगरसेविकेची कन्या होती. राज पाटील असे आरोपी पतीचे तर वैशाली पाटील असे मयत स्त्रीचे नाव आहे. वैशाली ही केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची कन्या होती.

वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील याचे दहा वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या माणेरे गावात राहणाऱ्या वैशाली भोईरसोबत लग्न झाले होते. मात्र, पत्नी आवडत नसल्याने राज याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातूनच शु्क्रवारी संध्याकाळी राज याने धारदार शस्त्राने वैशालीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैशालीचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे मलंगगड परिसरात तणाव काळी काळ तणाव पसरला होता.

Leave a Comment