Crop Insurance | पिक विम्याचा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा जास्त शुल्क मागितल्यास, ‘या’ ठिकाणी करा तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकासाठी पीक विमा भरत असतात. जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यांच्या पिकाचे नुकसान झाले,तर सरकारकडून त्यांनाही नुकसान भरपाई मिळते. या पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी केवळ एक रुपये शुल्क असते. परंतु अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांकडे एक रुपयापेक्षा जास्त पैसे मागतात. जर तुमच्याकडे जास्त पैसे मागत असाल, तर सरकारने तुम्हाला तक्रार करण्यासाठी सांगितलेली आहे. परंतु अनेक लोकांना ही तक्रार नक्की कुठे करावी हे समजत नाही.

आज-काल आरोग्य विमा जितका गरजेचा आहे. तितकाच पिक विमा (Crop Insurance) सुद्धा गरजेचा आहे. पिक विमाचा अर्ज भरताना लोकांना खूप त्रास होतो. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील केली जाते. यामुळे सरकारने त्यांना खबरदारी घेण्यास सांगितलेली आहे. शेतकऱ्यांकडे जर एक रुपयापेक्षा जास्त शुल्काची कुणी मागणी केली, तर त्यांना तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. यासाठी सरकारने टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे. त्याचप्रमाणे व्हाट्सअप आणि ईमेल आयडीचा वापर करून देखील तुम्ही तक्रार करू शकता.

कुठे कराल तक्रार? | Crop Insurance

टोल फ्री : 14411/ 18001800417
तक्रार नोंद : 022-414581933 / 022-414581934
व्हाट्सअ‍ॅप : 9082921948
ईमेल : [email protected]

या पिकांसाठी मिळणार पिक विमा

2024 च्या खरीप हंगामात भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी, नाचणी, भुईमुग, कारले, कांदा या 14 पिकांसाठी तुम्हाला सरकारकडून विमा मिळणार आहे. हा पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. त्यामुळे या तारखे अगोदर शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरून घ्या. यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन हा अर्ज करावा लागेल.