हिवाळ्यात खा ‘ही’ 5 फळे; रोगप्रतिकार शक्ती वाढेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा असून सगळीकडे कडाक्याची थंडी आहे. अशा वेळी सर्दी, ताप खोकला असे आजार होण्याची शक्यता असते . त्यासाठी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. हिवाळ्यात आजारापासून सुटका मिळवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी अनेकजण फळांचे सेवन करतात. अनेक जणांना हिवाळ्यात कोणती फळे खावीत? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात कोणती फळे खावीत याबाबत सांगणार आहोत.

1) डाळिंब-

थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. हिवाळ्यात डाळिंब खाणे फायदेशीर ठरते. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाब, हृदय, त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. डाळिंब खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होईल.

2) सफरचंद-

असं म्हणतात की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर राहतो. पण हे खर आहे. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय सफरचंदातील फायबर, व्हिटीमिन्स C आणि K आपल्या शरिराला मुबलक उर्जा देतात.

3) आवळा-

हिवाळ्यात आवळा खाण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत. आवळ्याचा रस दररोज पिल्याने केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. लिव्हरसाठीही आवळा खूप फायदेशीर आहे.

4) पेरू-

खरं सांगायचं तर थंडीमुळे अनेकजण पेरू खात खाण्याचे टाळतात. मात्र पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. त्यामुळे पेरूचे सेवन फायदेशीर ठरते.

5) मोसंबी-

मोसंबी हे एक आंबट फळ आहे. परंतु त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोसंबीचा रस काढून पिऊ शकता. रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते