अखेर राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली ‘ही’ महत्त्वाची आश्वासने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपापल्या पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) देखील म्हणजेच अजित पवार गटाकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा जाहीरनामा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाचून दाखवला. तसेच हाय जाहीरनामा राष्ट्रासाठी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने कोणत्या मुद्द्यांना सर्वाधिक महत्त्व दिले आहे आपण जाणून घेऊया.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

  • आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, रोजगार या पंचसूत्रांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक भर देणार.
  • राष्ट्रवादीचा जाहीरनामा अठरा पगड जातींचा विचार करणार आणि सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणारा असेल.
  • पुढील काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार .
  • यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार.
  • सरकार शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी प्रयत्न करेल.
  • अपारंपारिक वीज निर्मिती करण्यावर भर देणार.
  • शेतकरी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ करण्यात येणार.
  • शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ केली जाणार.
  • सरकार जातनिहाय जातगणना करणार.
  • उर्दू शाळांना ही सेमी इंग्लिशचा दर्जा दिला जाणार.
  • वक्षेत्रात पाण्याचे साठे तयार व्हावे यासाठी योजना आखली जाणार.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधान मोदी म्हणजे एनडीएचा विश्वासू चेहरा आहेत. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात निवडणुक लढवतोय त्यामुळं विजय नक्की होणार”