Pune-Bangalore महामार्गावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-बंगळुरू महामार्गवरील कराडजवळ चारचाकी वाहनाने ट्रकला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहीण भावाचा समावेश असून ही दुर्घटना कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे घडली आहे. या अपघातामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. जिला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पुन्हा सुरळीत केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिषेक जाधव, भारती जाधव आणि नितीन पोवार हे भाऊ-बहीण आपली चारचाकी गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी कराड जवळ पाचवड फाटा परिसरापर्यंत सुखरूप पोहोचली होती. मात्र याचवेळी गाडीने पुन्हा वेग धरला ज्यामुळे चालकाला समोर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज बांधता आला आहे. यानंतर ही चारचाकी गाडी थेट जाऊन ट्रकला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये जागीच अभिषेक जाधव, भारती जाधव आणि नितीन पोवार या तिघांचा मृत्यू झाला. तसेच चारचाकी गाडी देखील चक्काचूर झाली.

या अपघातामुळेच पुणे-बंगळुरू महामार्गवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जिला पुन्हा सुरळीत करण्यात आले. दरम्यान, या अपघातात मृत्यु झालेले नितीन पोवार  हे कोल्हापूर पोलिसात कार्यरत होते. ते अभिषेक जाधव, भारती जाधव यांच्यासह कामानिमित्त पुण्याला निघाले होते. मात्र याचवेळी त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे जाधव आणि पोवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, नितीन पोवार यांच्या जाण्याने कोल्हापूर पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.