‘नितीश कुमारांसोबत घात झालाय तेव्हा…’ बिहार निकालानंतर रोहित पवारांचे सूतोवाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत बलाढ्य शक्तींना एकाकी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं अनेकजण कौतुक करत आहेत. बिहारच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही भाष्य केलं आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले की, बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजपा ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पाहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment