फडणवीस उठाबशा काढत असतील तर आम्ही त्यांना चितपट करू! जयंत पाटलांचे थेट आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महा विकास आघाडीचाच विजय होईल” असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

पुण्यात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत उद्यापासून पुण्यातील 11 तालुक्यातून संयुक्त प्रचार सुरु करणार असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या तिकीटावर अरुण लाड रिंगणात आहेत.

दरम्यान, देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली म्हणून पदवीधरांसमोर मोठं संकट आहे. महावितरणचे 67 हजार कोटी 2014 नंतर फडणवीस सरकारकडून थकले आहेत. महाराष्ट्रावर आता संकट आलं आहे, मात्र भाजपमुळे मंत्रालय धोक्यात आलं, अशी टीकाही जयंत पाटलांनी यावेळी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात थकबाकी कशी वाढली याचा अभ्यास करायला वेळ द्या, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कशामुळे घडले यासाठी चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही जयंत पाटलांनी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment