उद्धव ठाकरे हे माझे मुख्यमंत्री त्यांचा अनादर स्वीकारार्ह नाही; इम्तियाज जलील यांनी कंगनाला फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामावर मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असा एकेरी उल्लेख करणे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना खटकलं. याप्रकरणावर ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

‘शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. पण उद्धव ठाकरे हे माझे मुख्यमंत्री आहे. त्यांचा अनादर तेही अशा टॉम, डिक आणि हॅरी करून हे स्वीकारार्ह नाही. कंगनाने तिने केलेल्या वक्तव्याचा विचार करायला हवा,’ असं इम्तियाज जलील यांनी ट्विट करून म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज तू माझं घर तोडलं आहे, उद्या तुझं गर्वहरण होईल असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. येणाऱ्या काळात आता याला वेगळं वळण लागलं आहे. दरम्यान, भाजपने कंगनाला लांबून पाठिंबा देत शिवसेनेवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाली होती कंगना ?
कंगना व्हिडिओत म्हणाली कि, ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तू माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुझं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तू माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment