निवडणुकीचा निकाल NDAच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं; तेजस्वी यादव ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच ‘धन्यवाद यात्रा’ काढणार आहेत.

तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांना राजद विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले. महाआघाडीने निवडणुकीत जनतेसमोर जाताना सकारात्मक आणि जनतेच्या मुद्यांना प्राधान्य दिले. या मुद्यांना लोकांचे भरपूर पाठबळ मिळाले, असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

नितीश कुमाररांवर डागली तोफ
तेजस्वी यादव यांनी जे तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत ते आजही सत्तेत बसण्यासाठी तयार असल्याची टीका नितीश कुमार यांचे नाव न घेता केली. ” नितीश कुमारांमध्ये थोडीफार नैतिकता राहिली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा”,असं आव्हान तेजस्वी यादव यांनी दिले.

सर्व आमदारांना पाटणामध्ये थांबण्याची विनंती
महाआघाडीच्या सर्व आमदारांनी पाटणा येथे थांबण्याचे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले. महाआघाडीचेच सरकार येईल, असंही त्यांनी सांगितले. बिहारच्या जनतेचे आभार मानण्यासाठी महाआघाडी संपूर्ण राज्यात धन्यवाद यात्रा काढणार आहे. ( Tejashwi Yadav will organize rally in Bihar for giving thanks to voters)

भाजपवर निशाणा
राजद बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. राजदला सर्वात मोठा पक्ष बनण्यापासून भाजपही रोखू शकला नाही. साम, दाम आणि बळाचा वापर करुन राजदला रोखण्याचा प्रयत्न झाला मात्र, सर्वात मोठा पक्ष होण्याचा जनादेश जनतेने आम्हाला दिला आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले.

विधानसभा पक्षीय बलाबल
एनडीएनं 243 जागांपैकी 125 जागांवर तर महाआघाडीनं 110 जागांवर विजय मिळवला. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजपनं 74, जेडीयूनं 43 आणि हिदुस्तान आवाम मोर्चा आणि विकाससील इन्सान पार्टीनं प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला. तर राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने 110 जागांवर विजय मिळवला. राजदनं 75, काँग्रेस 19 तर डाव्या पक्षांनी 16 जागांवर विजय मिळवला. एमआयएमनं सीमांचलमधील 5 जागांवर विजय मिळवला आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment