नितीन गडकरींची मोठी घोषणा ; येत्या 8 ते 10 दिवसांत टोल धोरणात बदल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशातील लाखो वाहनधारकांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल धोरणात मोठा बदल होण्याचे संकेत दिले आहेत. ‘रायझिंग इंडिया समिट 2025’मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, टोल भरकर्त्यांसाठी नवे धोरण तयार करण्यात येत आहे आणि ते येत्या ८ ते १० दिवसांत जाहीर केले जाईल.

गडकरी यांनी आश्वासन दिलं की, टोल शुल्क १०० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. “नवे धोरण तयार आहे, लवकरच जाहीर करू. टोल पूर्णतः माफ केला जाऊ शकतो,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

गडकरींच्या गाडीला दंड

सर्वसामान्य नागरिकांसह मंत्र्यांनाही वाहतूक नियम पाळावे लागतात, याचं एक मनोरंजक उदाहरण गडकरी यांनी दिलं. त्यांनी सांगितलं की, मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर त्यांच्या स्वतःच्या गाडीला दोनदा चलान मिळालं आहे. “मीच बांधलेला रस्ता, आणि माझीच गाडी दोनदा पकडली गेली,” असं म्हणत त्यांनी नियमांपासून कोणीही वाचू शकत नाही हे अधोरेखित केलं. “कॅमेरा सर्व काही कैद करतो. मी स्वतः ५०० रुपये दंड भरला. नियम तोडू नयेत, दंड महसूल वाढवण्यासाठी नसतो,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

अपघात रोखण्यासाठी सरकारचे पावले

रस्ते अपघात कमी करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. गडकरी म्हणाले, “रस्ते अभियांत्रिकीमधील चुका सुधारण्यासाठी आम्ही *४०,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना २५,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय, अपघातग्रस्तांच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठीही केंद्र सरकार पुढे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थोडक्यात काय?

  • टोल धोरणात मोठा बदल संभवतो
  • १००% टोल माफीची शक्यता
  • येत्या ८-१० दिवसांत धोरण जाहीर
  • वाहतूक नियमांपासून मंत्रीही अपवाद नाहीत
  • रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकार सज्ज

गडकरींच्या या घोषणेमुळे देशभरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता सर्वांचे लक्ष येत्या १० दिवसांत होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.