कृषी स्टार्टअपला सरकारकडून प्रोत्साहन; मंजूर केला 750 कोटींचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला देशात कृषिप्रधान देश आहे.देशात अनेक लोक हे शेती करत असतात त्यामुळे सरकार देखील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात. तसेच शेती व्यवसायात प्रगती व्हावी. यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा, यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न चालू आहेत. अशातच आता सरकारकडून शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि या निर्णयासाठी सरकारने तब्बल 750 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध केलेला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे. आता कृषी स्टार्टअपला मदत करण्यासाठी कृषी फंड देखील सुरू करण्यात आलेला आहे.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कृषी स्टार्टअप प्रोत्साहन देण्यासाठी 750 कोटी रुपयांचा ॲग्री शहर निधी स्थापन केलेला आहे. ॲग्रोटेक स्टार्टअपला मदत करणार आहे. सरकारने 14000 कोटी रुपयांच्या सात कृषी योजनांना मंजुरी दिलेली आहे. यासाठी आता खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न देखील चालू आहे. हा 750 कोटी रुपयांचा ऍग्रीशसुअर फंड स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना इक्विटी आणि कर्ज भांडवल प्रधान करणार.

कृषीमंत्र्यांनी या स्टेटसला निधीचा वापर करण्यास सांगितलेले आहे. ॲग्रीसाठी निधीची कमतरता भासणार नाही. असे देखील आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आहे. त्यामुळे आता इथून पुढे शेतीमध्ये केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी गुंतवणुकीची देखील गरज आहे. तसेच कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची देखील गरज असल्याचे त्यांनी सांगितलेले.

मोठ्या प्रमाणात शेती करायची असेल, तर लहान शेतकऱ्यांचे गट तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. असे देखील कृषिमंत्र्यांनी सांगितलेले आहे. तसेच रासायनिक कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतो. हे देखील त्यांनी सांगितलेले आहे तसेच मातीचे आरोग्य जपले पाहिजे. आपल्या मातीचा पोत खराब होऊ नये. असे देखील कृषीमंत्र्यांनी सांगितलेले आहे तसेच कृषी गुंतवणूक पोर्टलचे महत्व त्यांनी सांगितलेले आहे.