Government Scheme | सरकारच्या ‘या’ योजनांमधून शेतकऱ्यांना मिळतो आर्थिक लाभ; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Scheme | आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते. कारण भारतातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात अन्न पिकवतो. म्हणूनच सगळे अन्न खाऊ शकतात. परंतु शेती करताना देखील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे शेती करता येईल. त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्न देखील चांगले होणार आहे. अनेक लोकांना केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही माहित आहे. परंतु या योजनेशिवाय सरकारच्या (Government Scheme) अशा अनेक योजना आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना लाभ होतो. आता याच योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड योजना

क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करते. क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी शेतीसाठी सहज कर्ज घेऊ शकतात. यातील व्याजदरही खूपच कमी आहे. क्रेडिट कार्ड हा एक प्रकारचा कार्ड आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना क्रेडिट मर्यादा दिली जाते जी ते त्यांच्या कृषी क्रियाकलापांमध्ये वापरू शकतात. शेतकऱ्यांना ही रक्कम ठराविक वेळेनंतर भरावी लागते, जर शेतकरी वेळेवर बिल भरू शकले नाहीत. तर त्यांच्यावर अगदी कमी व्याज आकारले जाते.

पंतप्रधान पीक विमा योजना | Government Scheme

अनेक वेळा शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अनेकवेळा शेतकऱ्यांचे शेतीत नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची भेट देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील नुकसानीची भरपाई दिली जाते आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते. या योजनेची माहिती कोणत्याही शेतकरी सल्लागाराकडून मिळू शकते.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना

शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जातात. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात पाण्याचे स्प्रिंकलर, ठिबक सिंचन यंत्रणा तसेच इतर सिंचन उपकरणे बसवू शकतात. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सहज मिळू शकतो.

प्रधानमंत्री कुसुम योजना | Government Scheme

खेड्यापाड्यातील विजेची समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेती करताना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागू नये आणि शेतांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी शासनाने कुसुम योजना सुरू केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते, त्यासाठी त्यांना अनुदानही दिले जाते. या सोलर पॅनलमुळे शेतकरी सहजपणे वीज निर्मिती करू शकतात आणि उत्पादित वीज विकून उत्पन्नही मिळवू शकतात. या योजनेंतर्गत शेतकरी सौर पंप देखील खरेदी करू शकतात