कामावर का गेला नाही? असं विचारताच बायकोला विष पाजलं; परभणीत खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरा बायको म्हंटल तर प्रेम आलं, भांडण आलं आणि वादही आले. संसार म्हंटल तर भांड्याला भांड लागणारच, परंतु रागाच्या भरात आपल्या बायकोला नवऱ्यानेच विषारी द्रव्य पाजल्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली आहे. निमित्त होत ते म्हणजे तुम्ही कामावर का गेला नाही असा प्रश्न बायकोने नवऱ्याला केला, आणि रागाच्या भरात नवऱ्याने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेनंतर पतीविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

फिर्यादी शीतल नारायण पवार यांचं लग्न 2012 मध्ये नेहरूनगर भागातील नारायण उत्तम पवार यांच्यासोबत झालं होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बुधवारी संध्याकाळी नारायण पवार संध्याकाळी ५ वाजता घरी येताच तुम्ही कामावर का गेला नाही असा सवाल त्यांच्या बायकोने म्हणजे शीतल नारायण पवार यांनी केला. यानंतर नारायण याना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी बायकोला शिवीगाळ केली. बोलत बोलत वाद इतका टोकाला गेला कि तुला आता जिवंतच ठेवत नाही म्हणत नारायण पवार यांनी बायकोला विषारी द्रव पाजले. शीतल यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची सासू, नणंद आणि इतर आसपासच्या लोकांनी त्यांना नवर्याच्या तावडीतून सोडवलं.

विषारी द्रव पोटात गेल्यानंतर शीतल याना चक्कर येऊ लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. या सर्व घटनेनंतर शीतल पवार यांनी पती नारायण पवार यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी नारायण पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. परंतु या सर्व घटनेनंतर परभणी जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.