आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल : आ. महेश शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल. तेव्हा आमच्या नादाला लागलात तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढी पण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत, असा इशारा कोरेगाव विधानसभेचे आ. महेश शिंदे यांनी दिला आहे.

साताऱ्यातील जुन्या एमआयडीसी येथे एका कार्यक्रमात आ. महेश शिंदे बोलत हेते. कोरेगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी रेल्वे स्टेशन येथे फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आला असून याचे लोकार्पण कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याद्वारे कोरेगाव शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यात येणार असल्याने आरोग्याचा प्रश्न मिटणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले. कोरेगाव शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण आमदार महेश यांच्या हस्ते करण्यात आले.

ते म्हणाले, कोरेगाव मतदार संघ बदलला आहे. इथला आमदार आता महेश शिंदे आहे. या पुढं मतदार संघात गुंडगिरी दहशत माझ्या मतदार संघात सहन केली जाणार नाही, चालणार नाही. आमची कामाची पद्धत वेगळी आहे. MIDC मध्ये दहशत माजवणाऱ्यांना आणि खंडणी गोळा करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिला. कोरेगाव शहराच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेसाठी महत्वकांक्षी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी माँफकोमधील 4 एकर जागा आमच्या ताब्यात येत आहे. मागच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी जीरवण्याच्या नादात ती जागा आम्हाला जाणीवपूर्वक अडीच वर्षे मिळून दिली नसल्याचे सांगत अजित पवारांना टोला लागवलाय.

खळ उठळ आहे वस्ती उठवायला वेळ लागणार नाही..

मंत्री होण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. मला आमचे नेते एकनाथ शिंदे हे माझ्या अंगामधील गुणांना वाव देऊन मला मंत्रिमंडळात निश्चित संधी देतील, असे सांगत मंत्री पदाची इच्छा आमदार महेश शिंदे यांनी बोलून व्यक्त केली आहे. रामराजेंना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, मी छोटा आमदार आहे. खळ उठळ आहे, वस्ती उठवायला वेळ लागणार नाही. काही ठराविक जणांना पक्षात घेणार असल्याचे सांगत शिवसेनेचे 80 टक्के जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादीला विचारधारा काय आहे? याच उचल त्याचं उचल. कारखाना, सूतगिरणी खाऊन भ्रष्टाचार करणे असले राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा विसर हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांना आता पक्ष टिकवणे अवघड झाले आहे, म्हणूनच रोहित पवार निवडणुका लागतील विधान करत आहेत, असे सांगत राष्ट्रवादी पक्षावर टीका केली.