Satara News : धारदार शस्त्राने सपासप वार करत पती- पत्नीची केली निर्घृण हत्या!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार रा. आंधळी, ता. माण अशी मृत्यू झालेल्या पती – पत्नीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना शनिवारी रात्री साधारण दहा ते अकराच्या दरम्यान घडली. आज रविवारी सकाळी ११ अकरा वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खून केल्याने खळबळ उडाली आहे. गावातील संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार यांचा अज्ञाताने केला धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे.

रविवारी सकाळी गावातील काही लोक शेतात गेले असता त्यांना दोघांचेही मृतदेह शेतात आढळून आले. खून झालेल्या दोघांच्याही डोक्यात, मानेवर,धारदार शस्त्राने वार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या निर्घृण हत्येमागचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. इतक्या भयंकरपणे पती- पत्नीची हत्या केल्याने संपूर्ण माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.