Indian Railway | आता ट्रेन चुकली तर पैसे वाया जाणार नाही, रेल्वेने आणली ‘ही’ सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway | रेल्वेचा प्रवास हा सगळ्यात सुखद आरामदायी आणि कमी खर्चात होणारा प्रवास आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात विश्वासहार्य सेवा आहे. देशभरात दररोज अडीच कोटींपेक्षा जास्त लोक हे रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वे आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देखील देत असते. परंतु लोकांना या सुविधांची माहिती नसते. रेल्वे संबंधित देखील अनेक नियम केलेले आहेत. अनेक लोकांना हे नियम माहिती नसतात. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देत असतात.

लांब जायचं असेल तर लोक रेल्वेतून आधीच रिझर्वेशन करून प्रवास करतात. कारण त्यांना आरामदायी प्रवास करता येतो. परंतु अनेकदा त्या लोकांची ट्रेन (Indian Railway) चुकते पण अशावेळी नेमके काय करायचे? हे त्यांना माहीत नसते. ट्रेन चुकल्यानंतर पैसे वाया जातात. आणि हे तिकीट रद्द देखील करता येत नाही. परंतु यासाठी भारतीय रेल्वे तुम्हाला अशी एक सुविधा देते. त्यामुळे तुमचे कमी नुकसान होते. आता ही नक्की कोणती सुविधा आहे आपण जाणून घेणार आहोत.

टीडीआर फाईल करा | Indian Railway

तुम्ही जर भारतीय रेल्वेतून प्रवास करत असाल आणि प्रवासाची ट्रेन तिकीट बुक केली असेल आणि तुमची ट्रेन सुटली तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण टीडीआरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे हे नुकसान टाळू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचा रिफंड मिळेल आणि तुम्ही ऑफलाइन तिकीट देखील बुक केले असेल, तरी तुम्ही तिकीट काउंटवर जाऊन हा टीडीआर फाईल करू शकता. किंवा आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले असेल, तर तुम्ही आयआरसीटीच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल आणि त्यावेळी तुम्हाला टीडीआर फाईल करता येतो.

यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ट्रेनच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला टीडीआरचा ऑप्शन दिसेल. आणि टीडीआर फाईल करण्यासाठी तिकीट ऑप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. तुम्हाला दिलेल्या कारणांपैकी एक कारण निवडावे लागेल. तुम्ही हे केल्यानंतर 60 दिवसानंतर तुम्हाला हा रिफंड मिळेल. त्यामुळे आता जर तुमची ट्रेन चुकली, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण तुमचे तिकिटाचे पैसे वाया जाणार नाही.