Indian Railway : पुण्यातील आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रवासासाठी वाढलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक नवीन विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरू ते गोरखपूर दरम्यान धावणारी 06529/06530 समर स्पेशल एक्सप्रेस आता पुणे आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा (Indian Railway) घेणार आहे. त्यामुळे पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळी गर्दीचा विचार करून रेल्वेचा विशेष निर्णय
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे आपल्या मूळगावी किंवा पर्यटनस्थळी जात आहेत. यामुळे नियमित रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या असून, त्यातच बेंगळुरू-गोरखपूर समर स्पेशल ही एक नवी भर (Indian Railway) पडली आहे. ही गाडी फक्त उन्हाळी कालावधीसाठी मर्यादित वेळासाठी चालवली जाणार आहे.
प्रवासाचा कालावधी आणि गाडीची वेळ
- 06529 – बेंगळुरू ते गोरखपूर:
बेंगळुरू येथील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल वरून ही गाडी 12, 19 आणि 26 मे 2025 रोजी रवाना होईल. गाडीचा प्रवास 3 दिवस 11 तासांचा असून ती
4व्या दिवशी सकाळी 6:40 वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. - 06530 – गोरखपूर ते बेंगळुरू:
परतीचा प्रवास 16, 23 आणि 30 मे 2025 रोजी गोरखपूर येथून सुरू होईल. ही ट्रेन 3 दिवस 15 तासांचा प्रवास करून 4व्या दिवशी सकाळी 8:15 वाजता बेंगळुरू स्थानकावर पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे
ही समर स्पेशल ट्रेन महाराष्ट्रातील खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे:
- पुणे
- मनमाड
- भुसावळ
या थांब्यांमुळे पुणे व इतर भागांतील प्रवाशांना गोरखपूर किंवा बेंगळुरूपर्यंत थेट प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. याव्यतिरिक्त ट्रेन खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:
- खंडवा
- राणी कमलापती
- बीना
- झांसी
- उरई
- प्रयागराज
- वाराणसी
- मऊ
प्रवाशांसाठी सुवर्णसंधी
ही विशेष गाडी केवळ उन्हाळी कालावधीसाठीच चालवली जाणार असल्याने, प्रवाशांनी वेळेत तिकीट बुक करून प्रवासाची आखणी करणे गरजेचे आहे. ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी एक सोयीचा पर्याय ठरणार असून, गर्दी टाळण्यासाठी एक चांगली सुविधा म्हणून पाहिली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी प्रवाशांच्या मागणीनुसार पुढेही चालवण्याचा विचार केला जाऊ शकतो.