कराड-चिपळूण रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट; पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (संतोष गुरव) | पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची कराड ते चिपळूण या प्रकल्पाची संकल्पना अनेक वर्षे चर्चेत आहे. २०१२ साली तत्कालीन आघाडी मंत्रिमंडळाने हा प्रकल्प केंद्र सरकारने 50 तर एआज्य सरकारने 50 टक्के खर्च करून अमलात आणावा असा निर्णय घेतला. त्याला मान्यता देत निधीही देण्याची घोषणा केली. मात्र, काही दिवसांपूर्वी हा प्रकल्प २५ टक्के कोकण रेल्वे व ७५ टक्के व्यावसायिक शापूरजी पालनजी कंपनीने करावा, असा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला आले. त्यांच्या हस्ते भुमिपुजन पण केले.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे-बंगळूर हा महामार्ग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औदयोगिक प्रकल्प आहेत. आणि कोकणजरी अविकसित असला तरी या याठिकाणी मोठी जलसंपदा, बंदरे आहेत. पुढे सरकारने समृद्धी महामार्गालाप्राधान्य द्यायचे ठरवले. मात्र, या रेल्वे मार्गाला कमी लेखण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण जिल्ह्याहा विकास करण्याचा त्याचा विचार आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून मुख्यमंत्री शिंदे या रेल्वेमार्गाला चालना देणार का?असा प्रश्न अधिवेशनात चव्हाण यांनी उपस्थित केला.

कराड चिपळूण रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाबाबत सांगायचे झाले तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या कराड ते चिपळूण रेल्वे मार्गासाठी ऑगस्ट 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने करार केला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथे करण्यात आले होते. यानुसार शापुनजी पालनजी या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडे काम सोपविण्यात आले होते. आता हा प्रकल्प का रखडला आहे. याचा तातडीने विचार करून राज्य सरकारने पावले उचलावीत कारण हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

नेमका काय आहे हा प्रकल्प –

कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग १०३ कि.मी. लांबीचा असून, याचा प्रस्तावित खर्च 3,195.60 कोटी रुपये आहे. या मार्गावर कराडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हार पेठ, नाडे, पाटण, येराड, कोयना रोड ही ठिकाणे येणार होते. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे मार्गाला हा मार्ग मिळणार होता. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून प्रवाशी,व्यापारी किंवा उद्योग व्यावसायिकांना देशाच्या काना कोपऱ्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठीही मोठी मदत होणार होती.

असा होणार होता रेल्वेमार्ग –

1) लांबी १०३ किमी. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातून ३७ किमी, तर सातारा जिल्ह्यात ६६ किमीचा मार्ग.

2) कराड, चिपळूण, विहाले, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही रेल्वेस्थानके.

3) चिपळूण ते कराड हे आताचे रेल्वेचे अंतर ४२५ किमीने कमी होणार.

4) पर्यावरणाला हानी न पोहोचवता एकूण ४६ किमी लांबीचे अनेक बोगदे.