जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. यावरून आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनंतर आव्हाड यांनी ट्विट करत याबाबात माहिती दिली.

ठाणे येथील वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांची आज मारहाण प्रकरणी चौकशी केली. चौकशीनंतर आव्हाड यांना ताब्यात घेण्यात आले. आव्हाड आपल्या कार्यकर्त्यासह मॉलमध्ये घुसले. मॉलमधील प्रेक्षकांना कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई झाली आहे.

आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही., असे ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हंटले आहे.