मुख्यमंत्री शिंदेंकडून कर्जमाफीची घोषणा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. जवळपास 964 कोटींच्या या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज शिंदे- फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

भू- विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे. अशी एकूण एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी आहे. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासोबतच राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत. 30 जून 2022 पर्यतचे सर्व गुन्हे घेणार मागे घेण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले मोठे निर्णय-

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क” (MAGNET) संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य .

बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा

राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल ३११ कोटी करणार.

महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय.

१२५० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणार.

मराठवाडा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचत गट निर्माण करण्यात येणार आहेत. यामाध्यमातून 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच 5 जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण आखण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार. या माध्यमातून 75 हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर