निसर्ग चक्रीवादळ: जवळपास ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असून काही तासात हे वादळ रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील एकूण १३ हजार ५४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. अलिबागपासून ९५ किमीवर वादळ आले आहे. ४ तासांत अलिबागमध्ये धडकणार आहे. अलिबागच्या दक्षिणेला वादळ धडकणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळापासून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावरील उड्डाणे कमी करण्यात आली आहेत,को रोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत फक्त ५० उड्डाणे होत होती ती हि आता कमी करून फक्त १९ वर आणली आहेत यात ११ उड्डाणे घेतील तर ८ विमान मुंबईत येणार आहेत त्यातही बदल होऊ शकतो म्हणून प्रवाश्यानी घरातून निघण्याआधी परिस्थिती तपासूनच निघण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.

निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं असलं तरीही या वादळाचा धोका हा रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई या भागातही आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहतात. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे. जिथे जास्त धोका आहे या ठिकाणच्या प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा गुजरातमध्येही परिणाम जाणवायला लागला आहे. दमण परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या या भागामध्ये खबरदारी म्हणून पोलीस सतत पेट्रोलिंगवर आहेत. तसंच प्रशासनाकडून लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केले जात आहे. तर दुपारी १२ वाजता समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment