अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी ; तर श्रीरामपूर तालुक्यात मुसळधार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, कोल्हार, लोणी, राहता या भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपार पासून या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडणार हे निश्चित होते.

सायंकाळी बरोबर सहा वाजता पावसाने या भागात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. अत्यावश्यक सेवांसाठी घरा बाहेर पडलेल्या नागरिकांना मात्र या अचानक मुसळधार कोसळण्याने आहे तेथेच थांबावे लागले.

या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता जास्त असून आधीच आपत्कालीन स्थिती असतांना शेतकरी वर्गाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पावसाचा हरभरा, गहू अशा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

Leave a Comment