10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी!! टपाल विभागात 2508 जागांसाठी मेगाभरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील १० वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र टपाल विभागामध्ये तब्बल 2508 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – महाराष्ट्र टपाल विभाग

पद संख्या – 2508 पदे

भरले जाणारे पद – ग्रामीण डाक सेवक

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

मिळणारे वेतन –

शाखा पोस्ट मास्टर – Rs. 12,000/- to 29,380/- दरमहा
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – Rs. 10,000/- to 24,470/-

अर्ज फी –

General/ EWS Rs.100/-
Others Nil
Payment Mode Online

उमेदवार निवडीचे निकष –

सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/ गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in