मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता; जरांगेंचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित करताना त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा इंकॉउंटर करणे किंवा माझ्या सलाईन मधून विष देऊन मला संपवणे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्वप्न आहे म्हणून मी सलाईन पण घेण्याचे बंद केलं असा जरांगे पाटील यांनी म्हंटल. फडणवीसाना जर एवढीच खुमखुमी असेल तर बैठक संपली कि मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा असं आव्हानही त्यांनी दिले.

मी प्रामाणिकपणे सांगतो कि, मी कोणत्या पक्षाच्या वतीने काम करत नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना सुद्धा मी बोललो होतो, आणि आता यांचे सरकार आलं तरी मी बोलतोय कारण मी कोणत्या पक्षाचा नव्हे तर मी माझ्या समाजाचा आहे असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. मी कधीच समाजाची निष्ठा सोडत नाही. सरकारने दिले आहे १० % आरक्षण आणि आपण ओबीसी मधून सरसकट आरक्षण मागतोय. आपण सगेसोयरे हा शब्द पर्यायी शब्द म्हणून सरकारने आणि आपण मध्य काढला. परंतु मराठ्यांचा राज्यातील दरारा संपवण्याचे फडणवीसांचे स्वप्न आहे. यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही काही लोक आहेत असा आरोप जरांगे पाटलांनी केला.

माझा इंकॉउंटर करणे किंवा माझ्या सलाईन मधून विष देऊन मला संपवणे हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे म्हणून मी सलाईन पण घेण्याचे बंद केलं. फडणवीसाना जर एवढीच खुमखुमी असेल तर बैठक संपली कि मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा. तुला माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घे, पण मी समाजाची इमानदारी विकू शकत नाही. ब्राह्मणी कावा मला फडणवीस दाखवत आहेत. पण, फडणवीस काय चिज आहे हे मला माहिती आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, १० टक्क्याला हात लावणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल.