संपूर्ण भारत केरळच्या सोबतीला आहे – नरेंद्र मोदी

0
53
modi man ki baat
modi man ki baat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मन की बात मधून अटलबिहारी वाजपेयी यांनाही श्रद्धांजली

रेडिओ कॉलिंग | सुरज शेंडगे

‘मन की बात’ या महिन्यातील शेवटच्या रविवारी चालणाऱ्या महत्वपुर्ण रेडिओ कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी केरळ पुरग्रस्तांविषयी सहानुभूती व्यक्त केली. प्रत्येक भारतीय केरळवासीयांसाठी खांद्याला खांदा देऊन काम करतोय. संरक्षणसिद्ध असणाऱ्या आर्मी, नेव्ही, बीएसएफ, एनडीआरएफ, सीआयएसएफ यांनी या आपत्तीप्रसंगी लोकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो असंही मोदी म्हणाले. आजच्या ४७ व्या भागात मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकीर्दीवर सुद्धा प्रकाश टाकला. भारताला उत्तम प्रशासन आणि सकारात्मक, प्रवाही राजकारणाची वाट वाजपेयी यांनी दाखविली. संसदेत अर्थसंकल्प वेगळ्या वेळेत सादर करण्याची, केंद्र मंत्रिमंडळ राज्य मंत्रीमंडळापेक्षा १५% कमी करण्याची अनोखी संकल्पनाही वाजपेयींनी दिल्याची आठवण मोदींनी काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here