विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना पडले महागात; 4438 प्रवाशांकडून 16.85 लाख वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण  मुंबईच्या कल्याण रेल्वेस्टेशनवर पश्चिम रेल्वे विभागाच्या (Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची  सर्वात मोठी  तिकीट तपासणी  मोहीम राबवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी अभियान पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून चालवले जात आहे. तरी देखील प्रवासी विनातिकीट फिरताना दिसून येत आहेत.

167 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून तपासणी :

कल्याण रेल्वे स्टेशनवर (Kalyan Railway Station) 16 ऑक्टोबर रोजी दिवसभर तिकीट तपासणीची ही मोहीम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाद्वारे राबवण्यात आली. विशेष  बाब म्हणजे कल्याण रेल्वे  स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या लोकांना चाप लावण्यासाठी एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल 167 रेल्वेमधील तिकीट तपासणी व 35 RPF कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी कल्याण स्थानकात दादऱ्याजवळ व अन्य ठिकाणी मानवी भिंतीसदृश्य स्वरूप देऊन प्रवाश्यांची तिकीट तपासणी केली.

16.85 लाख रुपये वसुल करण्यात आला  :

कल्याण स्थानकात पार पडलेल्या तिकीट तपासणी अभियानाअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या नुसार, कल्याण  रेल्वे स्थानकात राबवण्यात आलेल्या ह्या मोहिमेत तब्बल 4438 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना पकडण्यात  आले. या सर्व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून दंड  स्वरूपात रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम 16.85 लाख रुपये वसुल करण्यात आले आहेत. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात 3.08 लाख  प्रवाश्यांना विनातिकीट पकडण्यात आले आहे व त्यांच्याकडून 17.31 करोड  इतका  दंड  वसुल  करण्यात आला आहे. तरी  देखिल प्रवासी सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीत.