Mumbai Nagpur Expressway : महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग होणार पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Nagpur Expressway : राज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आणि नागपूर ते गोवा शक्ती पीठ महामार्ग यांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास केवळ सात ते आठ तासात पूर्ण होणं शक्य होणार आहे कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी समृद्धी महामार्ग (Mumbai Nagpur Expressway) पूर्णत्वास येण्याची चिन्ह आहेत.

समृद्धी महामार्ग थेट मुंबईला होणार कनेक्ट

या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तातडीने काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग मुंबई पर्यंत जोडण्यासाठी शहापूर मध्ये वाहनांच्या वाहतुकीसाठी दोन पूल तयार केले आहेत यातला एक फुल जवळपास तयार झाला तर दुसऱ्या पुलाचे काम देखील सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही कारणास्तव दुसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले (Mumbai Nagpur Expressway) नाही तर आधीच्या पुलाच्या सहाय्याने एम एस आर डी सी निवडणुकीपूर्वी समृद्धी महामार्ग थेट मुंबईला कनेक्ट करण्याच्या योजनांवर काम करणार आहे.

काम जवळपास 95 टक्के पूर्ण (Mumbai Nagpur Expressway)

शहापूर मध्ये तयार असलेल्या एका पुलाला दोन भागांमध्ये विभाजन करून एम एस आर डी सी संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आतापर्यंत 625 किलोमीटर पर्यंत लांबीचा महामार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे तर अंतिम टप्पा म्हणजेच इगतपुरी ते ठाणे दरम्यानचा 76 किलोमीटरचा मार्ग तयार होतो आहे. एम एस आर टी सी च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम टप्प्यातील काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाला आहे फक्त आता एका (Mumbai Nagpur Expressway) पुलाचं काम बाकी आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी ते ठाणे पर्यंत महामार्गाचे काम हे खूप आव्हानात्मक आहे 76 किलोमीटरच्या या मार्गावर 16 पूल आणि चार बोगदे आहेत यातले 15 पूल आणि चार बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. शहापूर जवळील एका पुलाचे काम सुरू आहे. हा पूल 80 मीटर आहे. या पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊ शकते. इगतपुरी ते ठाणेदरम्यान एमएसआरडीसी ने डोंगरांच्या (Mumbai Nagpur Expressway) मधून बोगदा तयार केलाय तसंच दोन डोंगरांमध्ये एक पुल तयार करण्यास देखील वेळ लागतो आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुंबई ते नागपूर अवघ्या ७ तासांत

समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे खुलासानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या सात ते आठ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहेत त्याचबरोबर शिर्डीला पोहोचण्यासाठी आता सध्या सहा ते सात तासांचा वेळ लागतो तो मात्र तीन ते चार तासात पार (Mumbai Nagpur Expressway) करता येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मार्ग खुला होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.