“तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा,”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजपचे नेते तथा केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील भाषणात भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? असे म्हंटले होते. तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा. कोरोनाचे औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते जरा सांगा. किती खोके, पेट्या औषधामध्ये गेल्या?,” असा सवाल करत राणेंनी ठाकरेंवर आरोप केले.

नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले शिवाय हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, ज्या भाजपवर ठाकरे आता टीका करत आहेत. शिंदे गटातील आमदारांना हे रेडे म्हणत आहेत. तर मग उद्धव ठाकरे हे रेड्यांचे कॅप्टन होते का? त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर? आणि आताच तुम्हाला चोर दिसायला लागले काय?

आंदोलनाची भाषा करणारे उद्धव ठाकरे हे कधी आंदोलनाला गेले का? ते कधीही आंदोलनात गेले नाहीत. ते काय बोलणार आंदोलनावर. माझ्याकडे कोरोनाचे औषध खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे आहेत. इतकेच नाही तर कंपन्यांचाही पुरावा आहे. मालक बोलायला तयार आहेत की, किती टक्के मागत होते.औषधांअभावी अनेक माणसं गेली. आणि हे ठाकरे टक्के मागत होते”, असा आरोप राणे यांनी पत्रकार परिषदेवेळी केला.