धक्कादायक! भारतातील कोरोना बळींची संख्या ५०हजारा पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा देशातील वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता आणखी वाढवत आहे. अशा या परिस्थितीमध्ये सध्या चिंतेत टाकणारी बाब म्हणजे देशात कोरोनामुळं बळी गेलल्यांची संख्या. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळं दगावलेल्यांची संख्या ५० हजारांच्याही वर गेली आहे.

सोमवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात ५०हजार ९२१ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, मागील चोवीस तासांमध्ये ५७,९८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी ९४१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

कोरोना रुग्णांचा वेगाने वाढणारा आकडा पाहता देशभरातील एकूण रुग्णसंख्या आता, २६,४७,६६४ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ६,७६,९०० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर, १९,१९,८४३ रुग्णांना कोरोनावर मात केल्यामुळं रुग्णालयांतून रजा देण्यात आली आहे. देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही तुलनेनं जास्त असल्यामुळं ही काही अंशी दिलासादायक बाब ठरत आहे. असं असलं तरीही देशातील मृत्यूदरासोबतच रुग्णसंख्यावाढीवरही नियंत्रण मिळवण्याकडे आरोग्य यंत्रणांचा कल आहे. रुग्णसंख्या वाढीसाठीचा कालावधी आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची दिलासादायक संख्या यामध्ये मदतीची ठरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment