चंद्रकांतदादांचं चाललंय काय ?? काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय??

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.

दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

दहशतवादाविरुद्ध भारत आता अधिक आक्रमक – एअर चीफ मार्शल भादुरीया; वायुसेना दिवसानिमित्त देशभर उत्साह

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं.

गुजरातमध्ये समाजप्रबोधनाचा अनोखा गरबा, काय होतं नक्की या गरब्यात??

गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

सर्जिकल स्ट्राईकमध्ये चुकलेल्या चंदू चव्हाणची शोकांतिका

सेवेत पुन्हा रुजू झाल्यापासून मला योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचा खळबळजनक आरोप चंदू चव्हाण याने केला आहे.

इकडे गांधी, तिकडे गांधी ; जिकडे तिकडे गांधीच गांधी

महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरात साजरी होत आहे. गांधी समजून घ्यायचे प्रयत्न आजही सुरु आहेत. गांधी नक्की कुठे कुठे आहेत हे काव्यात्मक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न – नामदेव अंजना

प्रेरणादायी विचारांचा असामान्य माणूस – लाल बहादूर शास्त्री

देशातील सामान्य नागरिकाचं प्रतिबिंब लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनात प्रतीत होत होतं. देशातील शेतकरी आणि सैनिकांचं योगदान आपण कधीच विसरता कामा नये या त्यांच्या विचारामागील मूलभूत प्रेरणा ही सामाजिक ऐक्याची होती.

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.