Operation Sindoor: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या JF-17 फायटर जेटला पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या अखनूर परिसरात ही कारवाई करण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त असून, याचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे, ज्यात पाकिस्तानी पायलट जखमी अवस्थेत (Operation Sindoor) स्थानिकांच्या मदतीने दिसतो.
पायलटचा जीवघेणा क्षण कॅमेऱ्यात कैद (Operation Sindoor)
व्हिडीओमध्ये स्थानिक लोक जखमी पाकिस्तानी पायलटला उचलताना दिसत आहेत. काहीजण दुसऱ्या पायलटसाठी देखील मदतीचं आवाहन करताना ऐकायला येतात. हवाई सीमोल्लंघनाच्या प्रयत्नात पाकिस्तानच्या वायुदलाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय वायुसेनेच्या तडाख्याने त्यांचा JF-17 फायटर जेट जमिनीवर कोसळला.
Listen to them saying “Bring another pilot”
— sagar bhardwaj (@sagarjimmc) May 7, 2025
Which clearly indicates that a twin seater jet is down and to much surprise PAF operates a Twin seater version of JF-17 and it also operates a block of F-16’s.
Both are big shots!! #operation_sindoor pic.twitter.com/reyaMWue87
ऑपरेशन सिंदूरमागील पार्श्वभूमी
22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. 6 व 7 मेच्या रात्री 1.05 वाजता भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत एकूण 9 दहशतवादी (Operation Sindoor) तळांचा नाश केल्याची माहिती आहे.
JF-17 जेटचे सामर्थ्य आणि महत्त्व
JF-17 हे चीनच्या चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन आणि पाकिस्तानच्या एरोनॉटिकल कॉम्प्लेक्सने संयुक्तपणे विकसित केलेलं फायटर जेट आहे. हे हलकं, सिंगल इंजिन असलेलं लढाऊ विमान मॅक 1.6 वेगाने उडू शकतं आणि त्याचा वापर हवाई श्रेष्ठता, जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ले, तसेच जवळच्या सहाय्यक मोहिमांसाठी केला जातो.
सीमेवर तणाव (Operation Sindoor)
भारतीय संरक्षण तज्ज्ञांनी या कारवाईला अत्यंत निर्णायक पाऊल मानलं असून, हे पाऊल सीमावर्ती भागात संभाव्य हवाई हल्ले रोखण्यासाठी गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. भारतातील प्रमुख विरोधी पक्षांनीही सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं असून, भारतीय सेनेच्या संयम आणि अचूकतेची प्रशंसा केली आहे.
पाकिस्तानची प्रतिक्रिया
भारताच्या या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी “उत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र भारत स्पष्टपणे म्हणत आहे की, ऑपरेशन सिंदूर हे फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी असून, पाकिस्तानच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही.
विशेष सूचना प्रवाशांसाठी
सुरक्षा कारणास्तव देशातील अनेक विमानतळं बंद करण्यात आली असून, प्रवाशांना प्रवासापूर्वी अद्ययावत माहितीसाठी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येतो.




