भारतीय चिनी सैन्यातील उच्चस्तरीय कमांडर यांची सीमेवर भेट 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । लदाख च्या सीमेवर भारताने नुकताच एक रस्ता बनविण्याचे ठरविले असून तसे करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र चीन भारताने हे करू नये अशा भूमिका घेत आहे. यावरून काही दिवस दोन्ही सीमांवर तणाव आहे. मात्र भारताने तरीदेखील आपले काम सुरु ठेवण्याचे ठरविले होते. यावरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव होता. याबाबतच २२ आणि २३ मे रोजी LAC (वास्तविक नियंत्रण रेषा) वर चीन तथा भारतातील उच्चस्तरीय कमांडर्स यांनी भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

गेल्या पन्नास वर्षात चीनने या सीमेवर मोठ्या प्रमाणात विकास कार्य केले आहे. ज्या सीमेवरून वाद सुरु आहे. त्या गलवान भागात चीनने चारपदरी महामार्ग देखील बनविला आहे. तिथे काही बांधकाम देखील केले आहे. पण जेव्हा भारताने इथे आपले रस्ते बनवायला सुरुवात केली आहे. तेव्हा चीनने याचा विरोध केला आहे. कारण रस्ते बनवले तर त्यासोबत सैनिकांना राहण्यासाठी काही बंकर्स पण बनविले जातील. यामुळे चीनने याला विरोध केला होता. आणि सीमेवर चीनचे सैनिक व भारताचे सैनिक यांच्यामध्ये तणाव दिसून येत होता. हा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने दोन्हीकडच्या उच्चस्तरीय कमांडर्सनी भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

 

तर काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या सीमेवर चीनने स्वतःची ताकद वाढविली आहे. हे पाहून भारताने देखील आपली ताकद वाढविली आहे. सुरुवातीला सिक्कीम, लडाख आणि आता उत्तराखंड परिसरात चीनने आपली ताकद वाढविली आहे. सीमांवर विवाद आहेत मात्र अद्याप काही हालचाली झाल्या नाहीत. भारतावर गलवान घाटात सतत तणाव वाढविण्याचे काम करत असल्याचा चीनचा आरोप आहे. पण चीनला भारताच्या ताकदीचा अंदाज असल्याने हल्ला होण्याची शक्यता सांगता येत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment