हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आज त्या घटनेला एक आठवडा होऊन गेला आहे. पण अजूनही या घटनेचा सर्वत्र निषेध होताना दिसतोय. यासाठी भारताने कठोर पावले उचललेली आहेत. अन शत्रूला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी योजना आखली जात आहे. अशातच या घटनेबद्दल ( Pahalgam Terrorist Attack) नवीन माहिती समोर आली आहे. यामध्ये पहलगाम येथे फिरायला गेलेल्या जालन्यातील युवकाने गंभीर दावा केला आहे. तर तो दावा काय आहे हे सविस्तपणे जाणून घेऊयात.
हल्ल्याशी संबंधित एक महत्त्वाचा दावा समोर (Pahalgam Terrorist Attack) –
या हल्ल्याशी संबंधित एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील आदर्श राऊत या पर्यटकाने हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका संशयिताने त्याच्याशी संवाद साधल्याचा दावा केला आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, सदर व्यक्तीने त्याला “तू काश्मीरी आहेस का?” अन “हिंदू आहेस का?” असे विचारले होते. योसोबतच , त्या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्याशी “आज गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊया” अशी चर्चा करतानाही ऐकवलं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
NIA कडे ई-मेलद्वारे माहिती पाठवली –
सर्वात महत्वाची बाब म्हणजे आदर्श राऊत यांनी दावा केला आहे की, हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्रात त्याने पाहिलेली तीच व्यक्ती असल्याचं त्याला आठवले . त्यानंतर राऊत यांनी थेट NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे ई-मेलद्वारे ही माहिती पाठवली आहे.
भडक वक्तव्यांमुळेच पहलगामसारखा हल्ला –
या हल्ल्यामागे (Pahalgam Terrorist Attack) असीम मुनीर यांचा राजकीय हस्तक्षेप अन चिथावणीखोर वक्तव्ये असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तर थेट असा आरोप केला आहे की, असीम मुनीर यांच्या भडक वक्तव्यांमुळेच पहलगामसारखा हल्ला घडला. त्यामुळे भारत सध्या या दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी तयारी करत आहे. सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणाही सतर्क आहेत.