हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून, सीमावर्ती भागांत भारतीय सैन्याने युद्धसराव सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत अतिरेक्यांना “गाडून टाकण्याचा” इशारा दिला आहे. हल्ल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आश्वस्त करत म्हटले आहे कि , “शत्रूनं विचारही केला नसेल असा धडा शिकवला जाईल. यासोबतच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही तीव्र भूमिका घेतली असून, देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहे, तर या निर्देशनामध्ये त्यांनी काय म्हंटले आहे , हे जाणून घेऊयात.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश (Pahalgam Terrorist Attack ) –
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क साधून निर्देश दिले की, केंद्र सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात उरू नये, याची खबरदारी घ्यावी. केंद्राने जारी केलेले 18 प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले असून, त्यानुसार ही कारवाई होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील पाकिस्तानी (Pahalgam Terrorist Attack) नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला सूचना दिल्या असून, 48 तासांपेक्षा जास्त कुणीही राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.” तसेच ही कारवाई युद्धपातळीवर सुरू असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हल्ल्यानंतर संपूर्ण राजकीय पटलावर एकता –
हल्ल्यानंतर संपूर्ण राजकीय पटलावर एकता दिसून येत आहे. फडणवीस म्हणाले, “शत्रूच्या हल्ल्याच्या प्रसंगी देशातील प्रत्येक पक्ष एकत्र उभा राहतो, हीच आपली परंपरा आहे.”